डोळे असूनही आंधळे माणसे

राजाचा दरबार भरलेला असताना राजाने आपल्या सर्व मंत्र्यांना विचारले की आपल्या राज्यांमध्ये डोळे असलेल्या आंधळ्या लोकांची संख्या किती आहे. त्यावर सर्व मंत्री एकमेकांकडे आश्चर्याने पाहू लागले आणि कोणालाही याचे उत्तर सांगता येत नव्हते. त्याच दरबारामध्ये बिरबल ही उपस्थित होता. बिरबलाला ही हा प्रश्न विचारण्यात येतो.
तेव्हा बिरबल म्हणतो राजे मला याचे उत्तर देता येणार नाही परंतु आपल्या राज्यात डोळे असलेल्या आंधळ्याची संख्या भरपूर आहे. राजाने विचारले, असे तु ठामपणे कसे सांगू शकतो? त्यावर बिरबल म्हणतो, राजा मला दोन दिवसाची मुदत द्या मी तुम्हाला या दोन दिवसांमध्ये अशा लोकांची नावे आणून देतो.
दुसऱ्या दिवशी बिरबलाने आपला बिछाना अंगणात आणला आणि त्याचे राहिलेले अर्धे काम पूर्ण करू लागला. बिरबलाने रस्त्यावरून चाललेल्या एका माणसाला बोलावले आणि कागद-लेखणी घेऊन बसण्यास सांगितले.

रस्त्यावरून जाणारी सर्व लोक बिरबलाला येऊन विचारत होती की, हे काय चालले आहे?. बिरबलाने त्या सर्व लोकांची नावे लिहून घेण्यास सांगितले. बघता बघता ही माहिती संपूर्ण गावामध्ये पसरली. त्यामुळे गावातील सर्व लोक येऊन पाहू लागले की बिरबल हे काय करत आहे.
या गोष्टीची राजाला ही उत्सुकता होती त्यामुळे राजाही येऊन बिरबलाला विचारू लागला की बीरबल हे काय चालू आहे. तेव्हा बिरबलाने राजाचे नाव त्या कागदावर सर्वात वर लिहिण्यास सांगितले. दोन दिवसानंतर बिरबल तो कागद घेऊन दरबारात पोहोचला.
तेव्हा राजाने विचारले या कागदावर माझे नाव सर्वप्रथम का आहे? बिरबल म्हणाला मी माझ्या बिछान्याचे काम करत होतो हे पाहत असूनही लोक मला विचारत होते आणि तुम्हालाही उत्सुकता असल्यामुळे तुम्हीही माझ्या घरी आलात, तुम्ही राजा असल्यामुळे तुमचे नाव सर्वप्रथम असावे अशी माझी इच्छा होती.
राजा हसून म्हणाला की तू खूप हुशार आणि बुद्धिमान आहे शेवटी तू अशा लोकांची नावे शोधून काढली ज्यांना डोळे असूनही ती आंधळी आहेत.

Leave a Comment